गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; पती अनंत गर्जेला पुन्हा एसआयटीकडून अटक

मुंबई : भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पती अनंत गर्जे याला विशेष तपास पथकाने पुन्हा अटक केली आहे.


काही दिवसांपूर्वी गौरी गर्जे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. उच्चशिक्षित महिला आणि राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तीची पत्नी असल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती.


गौरी गर्जे मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एसआयटीकडून थेट कारवाई करत अनंत गर्जे याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.


 



 

अनंत गर्जे याला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नव्या अटकेमुळे तपासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गौरी गर्जे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर काही तासांतच वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. त्यानंतर तो आधी पोलीस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. वरळी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. अशातच एसआयटीकडून झालेली दुसरी अटक या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी ठरली आहे. आता एसआयटीच्या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Politics : शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना उधाण; मुलावरील आरोपांमुळे भेटल्याचा रोहित पवारांचा दावा मुंबई : ‘ऑपरेशन

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Vithabai Narayangaonkar : जाणून घ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

मुंबई : तमाशा विश्वातील अजरामर नाव : विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांना महाराष्ट्राच्या 'तमाशा सम्राज्ञी'

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया