शिउबाठाला मोठा धक्का! ऐन निवडणूकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांचा राम राम

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. दरम्यान उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण, ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून आज त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यानंतर मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. अखेर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकला आहे. उबाठानंतर त्यांनी आता सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.



कोण आहे तेजस्वी घोसाळकर?


तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.


दरम्यान, आज सकाळी १० वाजता वसंत स्मृती येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठासाठी हा मोठा धक्का आहे.
Comments
Add Comment

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सिडकोने केली घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट, जाणून घ्या सविस्तर

नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे

चेंबूरमधील हंडोरेंच्या बालेकिल्ल्याला आरक्षणाचा फटका, हंडोरे कुटुंबाशिवाय असणार काँगेसचा उमेदवार?

शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधी मुंबई (सचिन धानजी): मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच

विक्रमगडमधील १५० आदिवासी मुलांनी अनुभवली मुंबई; सनदी तसेच आयपीएस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी): आजवर कधीही रेल्वेने प्रवास न केलेल्या आणि मुंबईही न पाहिलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड

भटक्या कुत्र्यांच्या संख्येची अचूक माहिती महापालिका ठेवणार

संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसित मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील भटक्या श्वानांच्या

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान

महापालिका शाळांमध्ये श्रीमद् भगवत गीता पठण करण्याची भाजपची मागणी

माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी सभागृहातील ठरावाचे स्मरण करत आयुक्तांना दिले पत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी)