तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी एलडीएफच्या ४० वर्षांच्या राजवटीचा अंत करून महापालिकेवर नियंत्रण मिळवले.


तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ वॉर्डापैकी एनडीएने ५०, एलडीएफने २९, यूडीएफने १९ आणि दोन अपक्ष उमेदवारांनी जिंकले. भाजपने केरळमध्ये २६ ग्रामपंचायती तसेच दोन महापालिकांव विजय मिळवला. पण चर्चा आहे ती तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने मिळवलेल्या विजयाची. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपच्या केरळमधील कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे जाहीर अभिनंदन केले. मागील अेक पिढ्यांपासून केरळमध्ये बलिदान देणाऱ्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांना हा विजय म्हणजे आदरांजली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पक्षासाठी कार्यकर्ते ही खरी ताकद असल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले.


केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील विजय हा भाजपच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. केरळमधील राजकीय वातावरण बदलत असल्याचे हे ताजे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. तो काळ दूर नाही जेव्हा मतदार काँग्रेस, त्यांचे समर्थक, डावे यांना सोडून भाजपला भरघोस मतदान करू लागतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय