पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे ५८.८ लाख (५८,०८,००२) मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची तयारी सुरू आहे.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्याचे संपूर्ण राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून, तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मतदार यादीत अनेक प्रकारच्या मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात मोठा गट मृत मतदारांचा आहे. त्यानंतर नोंदणीकृत पत्त्यावर न सापडलेले, अस्पष्ट नोंदी असलेले मतदार यांचा समावेश आहे. ही नावे आता मसुदा मतदार यादीत दिसणार नाहीत.


राजकीय वर्तुळात खळबळ


मतदार यादीतील एवढ्या मोठ्या बदलांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याविरोधात धरणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र भाजपने (तृणमूल काँग्रेस) टीएमसीचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून,
१६ डिसेंबर रोजी मसुदा यादी प्रसिद्ध होणार आहे.


मोहिमेची कारणे आणि आकडेवारी


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमे'अंतर्गत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणानंतर ही नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत.




  • मृत मतदार : २४ लाखांहून अधिक.
    स्थलांतरित/अनुपस्थित : १२ लाखांहून अधिक.

  •  दुबार नोंदी : सुमारे २० लाख
    यांचा समावेश आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: "शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते"; पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी

India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब

राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या