मुंबईसह राज्यातल्या २९ महापालिकांसाठी कधी होणार मतदान ?

मुंबई : महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याचे लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.


सात-आठ वर्ष रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबर नंतर कधीही होऊ शकते , अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.


राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष आहे.


महापालिकांसाठी कधी होणार मतदान?


सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. याआधी २०१७ मध्ये निवडणुकीची घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांचे अंतर होते.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू

तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी

मुंबईत फुटबॉल स्टार मेस्सी येणार, वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

मुंबई : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. शनिवारी मेस्सी कोलकाता येथे होता.

नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावणार, तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती

गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित

मुंबईत रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन'; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर : मुंबईतील जमिनींवर भूमाफियांच्या मदतीने रोहिंग्या मुसलमानांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि बांधकामे वाढत

“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी दिली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ