मुंबईसह राज्यातल्या २९ महापालिकांसाठी कधी होणार मतदान ?

मुंबई : महापालिका निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद निवडणुका पार पाडल्यानंतर आता राज्याचे लक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.


सात-आठ वर्ष रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबर नंतर कधीही होऊ शकते , अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.


राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष आहे.


महापालिकांसाठी कधी होणार मतदान?


सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. याआधी २०१७ मध्ये निवडणुकीची घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांचे अंतर होते.

Comments
Add Comment

महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाजपचा पहिला घाव

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र मुंबई:

4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे.

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला

Share Market: शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीत चढउतार

मुंबई: देशांतर्गत शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (१६ फेब्रुवारी) सुरुवातीच्या सत्रात चढउतार

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याचा 'नादखुळा' अंदाज! पाकिस्तानला धूळ चारल्यावर ३ शब्दांत दिला विजयाचा मंत्र; काय लिहिलंय नेमकं?

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव करत क्रिकेट

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक