राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर


नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही काळापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. थरूर हे गुरुवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. थरूर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत थरूर यांनी पूर्वकल्पना दिली होती, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि चंडिगडचे खासदार मनीष तिवारी हेसुद्धा अनुपस्थित होते.


थरूर हे काल रात्री कोलकाता येथे प्रभात खेतान फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते, असे त्यांच्या एक्सवरील टाईमलाईनमधून दिसत आहे. थरूर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी शशी थरूर काँग्रेसच्या एका धोरणात्मक बैठकीला दांडी मारली होती. मात्र मी या बैठकीला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो नव्हतो, तर त्यावेळी मी केरळमधून येणाऱ्या विमानात होतो, असे शशी थरूर यांनी स्पष्ट केले होते.


सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला थरूर हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले होते. त्याआधी एसआयआरच्या मुद्द्यावर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीलाही थरूर यांनी प्रकृती अस्वस्थ्याचा हवाला देत दांडी मारली होती.


Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा