राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर


नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही काळापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. थरूर हे गुरुवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. थरूर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत थरूर यांनी पूर्वकल्पना दिली होती, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि चंडिगडचे खासदार मनीष तिवारी हेसुद्धा अनुपस्थित होते.


थरूर हे काल रात्री कोलकाता येथे प्रभात खेतान फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते, असे त्यांच्या एक्सवरील टाईमलाईनमधून दिसत आहे. थरूर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी शशी थरूर काँग्रेसच्या एका धोरणात्मक बैठकीला दांडी मारली होती. मात्र मी या बैठकीला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो नव्हतो, तर त्यावेळी मी केरळमधून येणाऱ्या विमानात होतो, असे शशी थरूर यांनी स्पष्ट केले होते.


सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला थरूर हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले होते. त्याआधी एसआयआरच्या मुद्द्यावर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीलाही थरूर यांनी प्रकृती अस्वस्थ्याचा हवाला देत दांडी मारली होती.


Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.