मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट
नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे किमान झाली असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने सांगितला. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.
नागपूरच्या एमआयडीसी, पाचपावली आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू थंडीने गारठल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. ते बेघर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचपावली येथे मेट्रोच्या पिलरखाली, तर एमआयडीसी परिसरात कॅफेसमोर मृतदेह आढळून आले. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. राज्यात पुढील ४८ तासात किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होणार असून त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
परभणीचा पारा घसरला
परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परभणीचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सध्या परभणीचे तापमान ५.५ अंशांवर नोंदवले गेले आहे, आणि त्यामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ही शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. येवढ्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतात ऊस ,हरबरा, ज्वारी , या पिकांना रात्रीची लाईट असल्याने पाणी देत आहे, तर परभणीचे तापमान अतिशय कमी झाले असल्याने शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे.
थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व भागांत कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर पारा १० अंशांच्या खाली आला आहे. विदर्भात तर थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृत्यू हे थंडीने गारठून झाल्याची शक्यता सांगितले जात आहे.