इंडिगोची उड्डाणं रद्द, शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान

मुंबई : इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाली. या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसला. पण फक्त प्रवासीच नाही तर विमानातून फुलांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.


लग्नसराईचा हंगाम आणि फुलांना असलेली आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी विमानांतून फुलांचा मोठ्या शहरांमध्ये पुरवठा करतात. वाजवी दरात फुलांची वाहतूक करणे शक्य असल्यामुळे देशातील अनेक शेतकरी विमानांचा पर्याय वापरत होते. यातही बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल फुलांच्या वाहतुकीसाठी इंडिगोची विमानं वापरण्याकडे होता. पण इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फुलांच्या वाहतुकीचे नियोजन कोलमडले.


मावळ तालुक्यातून दररोज सुमारे ५० हजार गुलाब फुलांची विमानाने निर्यात केली जाते. सामान्यतः एका गुलाबाचा भाव सरासरी २० रुपये असतो, पण या फुलांची किंमत दररोज दहा लाख रुपये होते. गुलाबांची निर्यात हा मावळमधील शेतकऱ्यांसाठी मोठा व्यवसाय आहे. मात्र, इंडिगोच्या विमानसेवेतील गोंधळामुळे देशांतर्गत आणि परदेशात निर्यात होणाऱ्या गुलाब फुलांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. ही परिस्थिती फक्त मावळचीच नाही राज्यातील अनेक फुल उत्पादकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. या तोट्याची भरपाई कोण करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

Comments
Add Comment

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील