स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अंदमान येथे अनावरण

'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रमाचे आयोजन


नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या 'सागरा प्राण तळमळला' या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून .उद्या १२ डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे 'सागरा प्राण तळमळला' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेत थेट सहभाग आणि सहयोगीता नोंदवता आली हे माझे भाग्य आहे, अशा भावना मंत्री आशिष शेलार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.


अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील 'व्हॅल्युएबल ग्रुप'च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता 'सागरा प्राण तळमळला' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 'व्हॅल्युएबल ग्रुप'चे संचालक अमेय हेटे यांची संकल्पना असलेला हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे.


पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार लेखक डॉ. विक्रम संपत, अभिनेते शरद पोंक्षे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर होणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन मेराक इव्हेंट्सच्या करीत आहेत.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास