रविंद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आगामी डावपेचांबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतल्या इतर घटक पक्षांसोबत कशा प्रकारे समन्वय राखायचा या संदर्भात रविंद्र चव्हाण आणि अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली. संघटनात्मक नियोजनासाठी अमित शाह यांनी रविंद्र चव्हाणांना मोलाचे मार्गदर्शन केले.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अलिकडेच चर्चा झाली. समन्वयाबाबत काही निर्णय झाले. या निर्णयांची माहिती देणे आणि पुढील नियोजनासाठी मार्गदर्शन घेणे या हेतूनेच रविंद्र चव्हाणांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. भेट सकारात्मक वातावरणात झाली.


राज्यात २ डिसेंबर रोजी एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यानंतर राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आणि जानेवारी २०२६ मध्ये राज्यातल्या २९ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व होणार असलेल्या निवडणुकांकरिता डावपेच आखण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

Comments
Add Comment

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा