प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर महाजन यांनी भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले, “त्यांच्याकडे माझे वैयक्तिक काम होते. मुख्यमंत्र्यांशी पारिवारिक संबंध आहेत.” यावेळी त्यांनी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांचे कौतुक करताना म्हटले, “वैभव खेडेकर भाजपमध्ये खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहण्यासाठी आलो आहे. वैभव कमळाकडे गेला, त्यामुळे मी खूश आहे. भाजपचा पराभव झाला की आम्हाला वाईट वाटते. नाते जुने आहे. मी कधीही भाजपविरोधात काम केलेले नाही. आता भाजपने ठरवायचे आहे.” असे सूचक विधान त्यांनी केले.


मी राज ठाकरेंना घाबरत नाही – प्रकाश महाजन

महाजन म्हणाले, “मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाने माघार घेतली. यामुळेच मी बाहेर पडलो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. हे मी कधी लपवले नाही. मी शाखेतही जातो. मी राज ठाकरेंना घाबरत नाही, संघ विचारांचा माणूस आहे”, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारतासाठी २०२५ वर्ष सर्वात उष्ण ठरणार?

नवी दिल्ली : जगभरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

राज्यात भीक मागणे हा गंभीर गुन्हा होणार

नागपूर : महाराष्ट्रात भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.

बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५

मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली

GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी ,माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबई : नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले.मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने