अंडरवर्ल्डमध्ये नव्या डॉनची एन्ट्री ; तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई : अंडरवर्ल्डच्या जगतात मोठी हालचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईपासून परदेशापर्यंत जाळं पसरवलेल्या दाऊद इब्राहिमच्या साम्राज्यावर आता नव्या गँगस्टरच्या उदयानं सावली पडत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवायांचा आढावा घेतल्यानंतर गुन्हेगारी जगतात नवीन समीकरणं निर्माण होत असल्याचं दिसत आहे.


अनमोल बिश्नोईने एनआयए चौकशीत दिलेल्या माहितीत लॉरेन्स बिश्नोई गँगची पोहोच, आर्थिक सामर्थ्य आणि गुन्हेगारी मॉडस ऑपरेन्डीबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या गँगचे ऑपरेशन भारताबरोबरच २५-२६ देशांपर्यंत पसरले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोशल मीडियाचा वापर, व्हर्च्युअल नंबरद्वारे धमकावणे आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या माध्यमातून या गँगने आपली गुन्हेगारी रचना उभी केल्याचे तपासात दिसत आहे.



दाऊद इब्राहिम आणि बिश्नोई गँगची तुलना का?


D-कंपनीचे जाळे प्रामुख्याने मुंबई, आखाची देश, दुबई, पाकिस्तान आणि युरोपच्या काही भागांवर मर्यादित होते. सोन्याची तस्करी, रिअल इस्टेट, ड्रग्स आणि अवैध वसुली या माध्यमातून दाऊदचे साम्राज्य उभे राहिले. पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आणि त्याच्या नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय एजन्सींचे लक्ष केंद्रित झाले.



लॉरेन्स गँगचे व्याप्ती वेगळी


लॉरेन्स बिश्नोई गँगचे ऑपरेशन सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे दिसते. कॅनडा, अमेरिका, थायलंड, कंबोडिया, पोर्तुगाल, रशिया यांच्यासह अनेक देशांमध्ये या गँगची उपस्थिती आढळल्याचे तपासात समोर येत आहे. फिल्म आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही या गँगने लक्ष्य केले असल्याचे प्रकरणांवरून उघड झाले आहे. काही घटनांमध्ये धमक्या देऊन आर्थिक उकळ काढण्याचा मार्ग अवलंबल्याचे आरोप आहेत.


अनमोल बिश्नोईच्या चौकशीत या गँगचे काही घटक सीमापार दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याचेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गँगची एकूण आर्थिक उलाढाल अंदाजे १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणांच्या मते, दोन्ही गँग्सच्या कामकाजाची पद्धत भिन्न असली तरी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या वाढत्या परदेशी संपर्कामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Comments
Add Comment

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि

४ दशकांची प्रतीक्षा संपणार; कोल्हापूर–कोकण रेल्वेने जोडले जाणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचा मार्ग

बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; ४०० हून अधिक बांधकामे हटवणार

बदलापूर : नगरपालिका निवडणुकांनंतर बदलापूर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, अनधिकृत बांधकामांविरोधात

प्रशासनात खांदेपालट, ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व

अजित पवार यांचे मंत्रालयातील दालन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे कायम

मुंबई : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालने कायम