जुन्नर वनविभागात बिबट्याचा हैदोस! २५ वर्षांत ५५ बळी, २८ हजार पशुधन फस्त; नसबंदी आणि AI कॅमेऱ्यांचा वापर करण्याची शासनाची माहिती

नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर आज विधिमंडळात चर्चा झाली. सरकारने लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १५० व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. याच कालावधीत, बिबट्याने पाळीव पशुधनाचेही मोठे नुकसान केले आहे. २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत २७ हजार ९५२ पशुधनाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक आकडेवारी शासनाने सादर केली आहे.



बिबट्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना


या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासनाने महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची माहिती दिली आहे, केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. जे बिबटे बंदिस्त केले जातील, त्यांचे राज्यातील इतर प्राणी संग्रहालये किंवा संरक्षित क्षेत्रांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरण केले जाईल. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र तसेच राज्यातील इतर केंद्रांचे विस्तारीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे आणि अनोइडर्स मशिन बसवण्याची उपाययोजनाही करण्यात येणार आहे.


जुन्नर वनविभाग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीव व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय