जुन्नर वनविभागात बिबट्याचा हैदोस! २५ वर्षांत ५५ बळी, २८ हजार पशुधन फस्त; नसबंदी आणि AI कॅमेऱ्यांचा वापर करण्याची शासनाची माहिती

नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर आज विधिमंडळात चर्चा झाली. सरकारने लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १५० व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. याच कालावधीत, बिबट्याने पाळीव पशुधनाचेही मोठे नुकसान केले आहे. २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत २७ हजार ९५२ पशुधनाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक आकडेवारी शासनाने सादर केली आहे.



बिबट्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना


या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासनाने महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची माहिती दिली आहे, केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. जे बिबटे बंदिस्त केले जातील, त्यांचे राज्यातील इतर प्राणी संग्रहालये किंवा संरक्षित क्षेत्रांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरण केले जाईल. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र तसेच राज्यातील इतर केंद्रांचे विस्तारीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे आणि अनोइडर्स मशिन बसवण्याची उपाययोजनाही करण्यात येणार आहे.


जुन्नर वनविभाग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीव व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास