एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश


पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी संसदेत मांडले आहेत. राज्याच्या क्रीडा, पर्यटन व जलस्रोत संवर्धन क्षेत्राला मोठी चालना देणारे हे प्रस्ताव असून, पालघर जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रस्ताव महत्त्वपूर्ण असणार आहेत.


महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे क्रीडा शिक्षण उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा प्रशिक्षकत्व या क्षेत्रांमध्ये उच्च गुणवत्तेचे शिक्षण सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे. याबाबत खासदार सवरा यांनी संसदेत विधेयक मांडले. या विधेयकाद्वारे राज्यात राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती आत्मसात केल्या जातील. राज्यात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सक्षम क्रीडा शिक्षणव्यवस्था उभारली जाईल. देशाला ११ हजार किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी किनारपट्टी पर्यटन सुविधांचा विकास,पायाभूत सोयीसुविधांचे जाळे निर्माण करणे आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांना चालना देण्यासाठी ‘कोस्टल टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड’ स्थापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित करण्यात आली. तसेच राज्यातील जलस्रोतांचे संवर्धन, पुनरुज्जीवन, टिकाऊ व्यवस्थापन या महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून विशेष आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सुद्धा खासदार सवरा यांनी संसदेत केली आहे.

Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी