जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना


नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव (बरड्याची वाडी) येथील एका महिलेने आपल्या पोटच्या सहा मुला–मुलींची केवळ पैशासाठी विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हलाकीच्या परिस्थितीमुळे तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


आर्थिक गरज मनुष्याला काय करण्यास भाग पाडेल याचा अंदाज बांधता येत नाही. घरातील बिकट आर्थिक स्थितीमुळे असे कृत्य घडल्याचे उदाहरण या घटनेतून समोर आले आहे. तब्बल १४ अपत्यांना जन्म देणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने फक्त १० हजार रुपये मिळवण्यासाठी एका बाळाची विक्री केली असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे एकूण सहा बालकांची विक्री केल्याचेही उघड झाले आहे.


या परिसरात अशाप्रकारच्या आणखी काही घटना झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम