शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती कायद्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप होत होता. काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्णयात बसत नव्हत्या. त्यामुळे हा कायदा परत पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

सभागृहात काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी शक्ती कायद्याचे काय झाले, अशी विचारणा केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधानाने राज्य व केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत. कोणताही कायदा करताना राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत. काही प्रमाणात जिथे समवर्ती सुचीतील विषय असतील तर राष्ट्रपती त्याला मान्यता देऊ शकतात. शक्ती कायद्यामुळे संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप होत होता. त्यामुळे हा कायदा परत करण्यात आला आहे. शक्ती कायद्यात ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्या तरतुदी केंद्राच्या नव्या तीन कायद्यांमध्ये आलेल्या आहेत. त्याशिवाय, काही तरतुदी या सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयात बसत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन