महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीवर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले आहे. आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभा परिसरातच ‘बिबट्याच्या वेशात’ दाखल होऊन या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले. ही घटना अधिवेशनातील प्रमुख आकर्षण ठरली आणि राजकीय व सामाजिक चर्चेचा विषय बनली. आमदार शरद सोनवणे यांनी या प्रश्नाची तीव्रता सभागृहासमोर मांडून सरकारला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.



बिबट्यांच्या हल्ल्यांची भयावह आकडेवारी आणि भीतीचे वातावरण:


आमदार सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या तब्बल नऊ ते दहा हजारांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या संख्येमुळे मनुष्य-प्राणी संघर्ष वाढला आहे. एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये ५५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले अंगणात खेळायलाही धजावत नाहीत. शेतकरी शेतीत काम करण्यासाठी कचरत आहेत, ज्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.



'राज्य आपत्ती' घोषित करण्याची आणि तातडीने रेस्क्यू सेंटर्स उभारण्याची मागणी


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सोनवणे यांनी सरकारकडे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यांना 'राज्य आपत्ती' घोषित करून, मुख्यमंत्र्यांनी यावर 'सु-मोटो' निर्णय घ्यावा. सध्याचे उपाय निरुपयोगी ठरत असल्याने, बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी तातडीने केंद्रे उभारण्याची गरज आहे. जुन्नर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे प्रत्येकी एक हजार बिबटे ठेवता येतील, अशा क्षमतेची दोन रेस्क्यू सेंटर्स तीन महिन्यांच्या आत उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.



विधानपरिषदेतही गंभीर चर्चा


याचदरम्यान, नागपुरात जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तिथेही बिबट्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानपरिषदेत या विषयावर माहिती दिली, आज नागपूरात बिबट्या आढळला आहे, त्याबद्दल माहिती घेतली आहे. कालदेखील खालच्या सभागृहात सविस्तर चर्चा झाली आहे. आज विदर्भातील आमदारांची बैठक लावण्यात आली आहे.... यामध्ये आणखी सविस्तर चर्चा केली जाईल."

Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर