वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) उद्ध्वस्त करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालय (डी.आर्.आय.) यांनी ही कारवाई केली. मात्र पोलीस विभाग अनभिज्ञ होता. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा मुद्दा आर्वीचे भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला.


या कारवाईच्या वेळी जवळपास १९२ कोटी रुपये किमतीचे १२८ किलो मेफेड्रोन, २४ किलो प्रीकर्सर रसायने, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन हिन्टरलँड ब्लू’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. याच सुमारास वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घा.) परिसरातील दुर्गम भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आल्याची गुप्त माहिती ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्‍यांना मिळाली. या आधारावर शोध मोहीम राबवण्यात आली. प्रथमच अशी मोठी कारवाई झाली. असा कारखाना जिल्ह्यात चालू असतांना पोलीस विभागाला याची कल्पना कशी नव्हती? हा मोठा प्रश्न आहे. याची सभागृहाने नोंद घ्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली. युवा पिढीचे भविष्य अधारांत टाकणारा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा