वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) उद्ध्वस्त करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालय (डी.आर्.आय.) यांनी ही कारवाई केली. मात्र पोलीस विभाग अनभिज्ञ होता. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा मुद्दा आर्वीचे भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला.


या कारवाईच्या वेळी जवळपास १९२ कोटी रुपये किमतीचे १२८ किलो मेफेड्रोन, २४ किलो प्रीकर्सर रसायने, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन हिन्टरलँड ब्लू’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. याच सुमारास वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घा.) परिसरातील दुर्गम भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आल्याची गुप्त माहिती ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्‍यांना मिळाली. या आधारावर शोध मोहीम राबवण्यात आली. प्रथमच अशी मोठी कारवाई झाली. असा कारखाना जिल्ह्यात चालू असतांना पोलीस विभागाला याची कल्पना कशी नव्हती? हा मोठा प्रश्न आहे. याची सभागृहाने नोंद घ्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली. युवा पिढीचे भविष्य अधारांत टाकणारा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

इराणकडून अमेरिकेचे KC-135 शक्तिशाली विमान नष्ट

नवी दिल्ली: अमेरिकेला इराणकडून अत्यंत तीव्र आणि जशास तसे प्रत्युत्तर मिळत आहे. अमेरिकेने ज्या गोष्टीची कधी

Iran-US-Israel War : 'आम्ही युद्ध थांबवू पण...'; युद्ध थांबवण्यासाठी इराणने ठेवल्या तीन अटी

मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. ही लढाई प्रत्येक

लवकरच उभारले जाणार ‘मराठी भाषा भवन’; मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विधानपरिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या

Jahnavi Killekar : ‘ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र?’; रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरची टीका, बिग बॉस व रितेश देशमुखांविरोधातील वक्तव्यांवर संताप

मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :