वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.


राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, मॉलमध्ये मधल्या भिंती काढून फेरबदल करण्यात आले होते. यासाठीचा बदल आराखडा महापालिकेने २४ फेब्रुवारी २०२० रोजी मंजूर केला होता. तसेच बहुउद्देशीय हॉलसाठी पर्पज बदलाची परवानगी २०२३ मध्ये देण्यात आली होती. या काळात दोन कोटींच्या दंडाची वसुली आणि तीन कोटींचा प्रीमियम महापालिकेने घेतला. मे महिन्यात आलेल्या तक्रारीनंतर तपासात मॉलमध्ये शेडसह नवीन अतिक्रमण असल्याचे महापालिकेने मान्य केले असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तसेच इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्ट्रक्चरल सुरक्षिततेबाबतही महापालिकेला तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


या मॉलमध्ये वारंवार विनापरवाना बांधकाम होत असल्यास एमआरटीपी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

Comments
Add Comment

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न