कोल्हापूरमधील ‘ईव्हीएम स्ट्राँग रूम’ बाहेरील सीसीटीव्ही हटवल्याप्रकरणी सखोल चौकशी होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सरकारने घेतली गंभीर दखल

नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ-वडगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हटवल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन बुधवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.


सतेज पाटील म्हणाले, “सामान्य नागरिकाला आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचा मूलभूत अधिकार आहे, मग ईव्हीएम स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे पोलीस किंवा प्रशासनाला काढण्याचा अधिकार कोणी दिला?” स्ट्राँग रूमचा परिसर पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये असायला हवा असताना उलट कॅमेरे हटवले गेल्याने हा परिसर ‘ब्लाइंड झोन’मध्ये गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या कृत्यामागे हेतूपुरस्सर कट असल्याचा संशय व्यक्त करत पाटील यांनी कॅमेरे हटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई आणि सर्व कॅमेरे पुन्हा बसवण्याचे आदेश देण्याची मागणी केली.


या आरोपांवर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात स्पष्ट केले की, “सरकारने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यामागील सर्व परिस्थितीची सविस्तर चौकशी केली जाईल. प्रशासनाने कायदेशीर अधिकारांच्या मर्यादेत राहूनच काम करावे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता घेतली जाईल. सरकार या घटनेवरील शंका दूर करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९