नितेश राणेंचा ‘कॅश बाँब’!” कर्जतच्या फार्महाऊसवर नोटांची बंडलं गाडलीत का?'

नितेश राणेंच ठाकरे पिता-पुत्राला 'चॅलेंज'


नागपूर': आमदार महेंद्र दळवी यांच्या कथित 'नोटांच्या बंडलां'च्या व्हिडिओमुळे राज्यात खळबळ उडालेली असतानाच, भाजप आमदार नितेश राणे यांनी यात उडी घेत ठाकरे पिता-पुत्राला 'चॅलेंज' केलं आहे.


उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्महाऊसवर नोटांची बंडलं गाडल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला. ते म्हणाले, "कधीतरी कर्जतच्या फार्महाऊसवर तुम्ही सगळेजण पत्रकार चला. आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवलीय, हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विचारा ना जरा!" राणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्च ऑपरेशन करण्याची मागणी करत, ठाकरेंच्या कथित फार्महाऊसवर छापा टाकल्यास पळापळ होईल, असा दावा केला.


दळवींच्या व्हिडिओवर ठाकरे गटाचे आमदार व कार्यकर्ते करत असलेल्या आरोपांना राणे यांनी जगातील सर्वात मोठे आश्चर्य असे संबोधले. कॅशच्या सगळ्या विषयांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बोलूच नये, असा सज्जड दमही त्यांनी भरला. यापुढे बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरेंनी सरकारवर केलेल्या 'शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी' या टीकेलाही उत्तर दिले. ते म्हणाले, "म्हणून तर बोलतो ना, उद्धव ठाकरे उपाशी, शिवसैनिक उपाशी तोच विषय आहे हा!"

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९