विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा पांडुरंगाचा पालखी सोहळा यावर्षी ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. राम मंदिर ते वडाळा विठ्ठल मंदिर या दरम्यान होणा-या या पालखी सोहळ्याच्या आयोजनाची बैठक श्री वारकरी प्रबोधन महा समितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राम मंदिर कॉटन ग्रीन येथे पार पडली.

श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान जे उपक्रम होतात ते सर्व उपक्रम या पालखी सोहळ्यात होतात. ज्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होता येत नाही ते सर्व वारकरी मुंबईतील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. सात दिवस कीर्तन महोत्सव, संत संमेलन, घोड्याचे गोल रिंगण आणि पालखी सोहळा असे या संमेलनाचे स्वरूप असते.

यावर्षी होणा-या कीर्तन महोत्सवात दिपाली झुमके (कल्याण),महादेव महाराज मोरे (घाटकोपर), सुप्रिया साठे (आळंदी), केशव महाराज भागडे (इगतपुरी), डॉ. विवेक महाराज चव्हाण (आळंदी), महेंद्र महाराज भगवान गडकर, रामेश्वर महाराज शास्त्री, सुजाता महाराज गोपाळे आदी कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. या बैठकीला उपाध्यक्ष अशोक महाराज सूर्यवंशी, सचिव राजाराम उर्फ नाना निकम, सहसचिव शामसुंदर महाराज सोन्नर, खजिनदार बळवंत महाराज आवटे, विश्वस्त बाबासाहेब महाराज मिसाळ, दीपक शिंदे उपस्थित होते. या बैठकीमध्ये यावर्षीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यात संत संमेलन होते. यावेळी वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध वारकरी प्रबोधनकारांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तर वारकरी संप्रदायाची अविरत सेवा करणा-या ज्येष्ठ प्रबोधनकाराला हैबत बाबा वारकरी सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तर दरवर्षी दिंडीमध्ये सहभागी होणा-या दिंड्यामधील तीन आदर्श दिंड्याना पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यात दैनिक 'सामना'च्या वतीनेही समाजप्रबोधन पुरस्कार दिला जातो. त्यावरही या बैठकीत  चर्चा  झाली.
Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण