कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१ धावांनी जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव झाला. कटकच्या सामन्यात भारताचा हार्दिक पांड्या चमकला. त्याने नाबाद ५९ धावा केल्या तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एका फलंदाजालाही बाद केले. कटकमध्ये झालेल्या विजयामुळे भारताने पाच सामन्याच्या टी २० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे.



कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सहा बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ७४ धावांत आटोपला. भारताने १२.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. भारताकडून अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शून्य, एडेन मर्करामने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २२, डेव्हिड मिलरने एक, डोनोव्हन फरेराने पाच, मार्को जॅनसेनने १२, केशव महाराजने शून्य, अँरिक नॉर्टजेने एक, लुथो सिपामलाने दोन, लुंगी न्गिडीने नाबाद दोन धावांचे योगदान दिले.


याआधी भारताकडून अभिषेक शर्माने १७, शुभमन गिलने चार, सूर्यकुमार यादवने १२, तिलक वर्माने २६, अक्षर पटेलने २३, हार्दिक पांड्याने नाबाद ५९, शिवम दुबेने ११, जितेश वर्माने नाबाद दहा धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी न्गिडीने तीन, लुथो सिपामलाने दोन आणि डोनोव्हन फरेराने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना