कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१ धावांनी जिंकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव झाला. कटकच्या सामन्यात भारताचा हार्दिक पांड्या चमकला. त्याने नाबाद ५९ धावा केल्या तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एका फलंदाजालाही बाद केले. कटकमध्ये झालेल्या विजयामुळे भारताने पाच सामन्याच्या टी २० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली आहे.



कटकच्या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सहा बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ७४ धावांत आटोपला. भारताने १२.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. भारताकडून अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने शून्य, एडेन मर्करामने १४, ट्रिस्टन स्टब्सने १४, डेवॉल्ड ब्रेव्हिसने २२, डेव्हिड मिलरने एक, डोनोव्हन फरेराने पाच, मार्को जॅनसेनने १२, केशव महाराजने शून्य, अँरिक नॉर्टजेने एक, लुथो सिपामलाने दोन, लुंगी न्गिडीने नाबाद दोन धावांचे योगदान दिले.


याआधी भारताकडून अभिषेक शर्माने १७, शुभमन गिलने चार, सूर्यकुमार यादवने १२, तिलक वर्माने २६, अक्षर पटेलने २३, हार्दिक पांड्याने नाबाद ५९, शिवम दुबेने ११, जितेश वर्माने नाबाद दहा धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी न्गिडीने तीन, लुथो सिपामलाने दोन आणि डोनोव्हन फरेराने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील