उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५०


शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता पंचायत समितीने ग्रामपंचायतींमार्फत २१ वनराई बंधारे बांधले असून तालुका कृषी विभागातील कृषी सहायकांना प्रत्येकी ५ असे एकूण १० सहायकांमार्फत ५० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले.


पोलादपूर तालुक्यात उन्हाळ्यात गुरांच्या पाण्यासोबतच कपडे, भांडी धुण्याच्या तसेच आवश्यक वाटल्यास पिण्याच्या, आंघोळीच्या पाण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरत आहे. मात्र, निवडणुकांच्या काळात वनराई बंधारे बांधण्याचा विसर पडत असल्याने उन्हाळयात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. पोलादपूर तालुक्यात पंचायत समितीने आतापर्यंत १७ ग्रामपंचायतींच्या मार्फत २१ बंधारे बांधल्याची माहिती गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांच्यावतीने कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी तसेच अरूण धीवरे यांनी दिली. यामध्ये तुर्भे खुर्द, धामणदिवी, तुर्भे बुद्रुक, काटेतळी, तुर्भे खोंडा, कोतवाल खुर्द, देवपूर, धारवली, आडावळे बुद्रुक, देवळे, कुडपण बुद्रुक, परसुले आणि गोवेले या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ तर सडवली, दिविल, वाकण आणि बोरघर या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी २ याप्रमाणे २१ वनराई बंधारे बांधले आहेत. दरम्यान, पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली १० कृषी सहायकांच्या माध्यमातून प्रत्येकी ५ तर तालुक्यात लोकसहभागातून ५० बंधारे उभारण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयातून विविध विकास कामांसाठी वापरण्यात आलेली सिमेंटची रिकामी पोती गोळा करण्यात येऊन या वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येते. वनराई बंधाऱ्यांमुळे उन्हाळयात बंधाऱ्याच्या परिसरातील विहिरी तसेच बोअरवेलच्या पाणीपातळीमध्ये वाढ होते.

Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Smartphone : कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा स्मार्टफोन

फक्त १० हजारांच्या आत नवा झेनो २००' स्मार्टफोन लाँच मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

मुंबई: महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून

महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ 'बालस्नेही' आणि 'जलसमृद्धी'मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम नवी दिल्ली :

Nashik TCS Case : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने