फिल्म बनवण्याच्या नावाखाली डॉक्टरची कोट्यवधींची फसवणूक

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक


मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यावर उदयपूरमधील एका डॉक्टरकडून फिल्म बनवण्याच्या नावाखाली ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. उदयपूर पोलिसांनी कारवाई करत भट्ट यांना मुंबईतील यारी रोडवरील गंगा भवन अपार्टमेंटमध्ये त्यांच्या मेव्हणीच्या घरातून अटक केली. आता त्यांना उदयपूरला आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया सुरू आहे.


उदयपूरच्या भूपालपुरा पोलीस ठाण्यात इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक डॉ. अजय मुर्डिया यांनी १७ नोव्हेंबर रोजी विक्रम भट्ट यांच्यासह ८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. तक्रारीनुसार, डॉक्टरांच्या पत्नीचा बायोपिक बनवण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले, पण प्रत्यक्षात चित्रपटाच्या निर्मितीची कोणतीही प्रगती झाली नाही.


डॉ. मुर्डिया यांची ओळख एका इव्हेंटमध्ये दिनेश कटारिया यांच्याशी झाली होती. त्यांनी डॉक्टरांच्या पत्नीवरील बायोपिक बनवण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांना मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये बोलावण्यात आले, जिथे त्यांची भेट विक्रम भट्ट यांच्याशी घडवून देण्यात आली. चर्चेत ठरले की चित्रपट निर्मितीची संपूर्ण जबाबदारी भट्ट सांभाळतील आणि डॉक्टरांनी फक्त पैसे पाठवायचे असतील. भट्ट यांनी हेही सांगितले की त्यांची पत्नी श्वेतांबरी आणि मुलगी कृष्णा सुद्धा चित्रपट निर्मितीशी संबंधित आहेत.


पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले की इंदिरा एंटरटेनमेंटच्या खात्यातून ज्यांना पेमेंट करण्यात आले, ते बहुतेक वेंडर्स बनावट होते. अनेक जण पुताईचे काम किंवा ऑटो चालवण्याचे काम करणारे निघाले. पेमेंट झाल्यानंतर मोठी रक्कम विक्रम भट्ट यांच्या पत्नीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. यामुळे आर्थिक अनियमिततांची पुष्टी होते.


या प्रकरणात उदयपूर पोलिसांनी यापूर्वीच मुंबईहून को-प्रोड्यूसर मेहबूब अन्सारी आणि वेंडर त्रिभोवन यांना अटक केली आहे. आता दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या अटकेनंतर तपास अधिक वेगाने सुरू आहे. पोलिस संपूर्ण नेटवर्कची भूमिका, आर्थिक व्यवहारांचे तपशील आणि गुंतलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करत आहेत. विक्रम भट्ट सारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे नाव फसवणूक प्रकरणात समोर आल्याने चित्रपटसृष्टीतही मोठी चर्चा रंगत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :