महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू, वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष गायन

नागपूर :  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरूवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगण यांच्यासह सभागृहाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले. विधानसभेप्रमाणेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेत सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम् गीतास ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वंदे मातरम्‌चे संपूर्ण गायन करण्यात आले. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य व विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.





वंदे मातरम आणि राज्यगीतानंतर, दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या मंत्र्यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित विविध अध्यादेश मांडले.




Comments
Add Comment

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद