भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी करत आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या निर्णयामागे बांगलादेशातील परिस्थिती कारणीभूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना विचारण्यात आले की, शेख हसीना जितका काळ इच्छितात तितका काळ भारतात राहू शकतात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हा वेगळा प्रश्न होता. त्या काही खास परिस्थितींमध्ये येथे आल्या, पण निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.” परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की भारत हा बांगलादेशचा शुभचिंतक आहे.


भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशच्या विद्यमान नेतृत्वाने मागील निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, जर मुद्दा निवडणुकीचा असेल, तर सर्वप्रथम निष्पक्ष निवडणुका होणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावर जोर दिला की,भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाहीची वैधता टिकून राहावी असे वाटते. पुढे त्यांनी सांगितले त्यांना विश्वास आहे की बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून जेही नेतृत्व पुढे येईल, ते भारताशी असलेल्या संबंधांविषयी संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवेल, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये किंचित तणाव निर्माण झाला आहे, हेही त्यांनी मान्य केले. गेल्या महिन्यातच बांगलादेशात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या मागणीवर भारत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.

Comments
Add Comment

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

Bullet Train : "बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या' मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ

Cigarette Price Increase in India : चहा-सुट्टाचा प्लॅन आता 'महागात' पडणार! एका सिगरेटसाठी तब्बल ७२ रुपये? काय आहे सरकारचा नवा नियम

७ वर्षांनंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढ नवी दिल्ली : देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत १ फेब्रुवारी २०२६

Explosion In Himachal Pradesh : हिमाचलमध्ये नववर्षाची सुरुवात हादरवणारी! नालागढमध्ये शक्तिशाली स्फोट, आर्मी हॉस्पिटलच्या काचांचा पडला खच

सोलन : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालागढ

Vande Bharat Sleeper Train Route : ठरलं! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार; प्रवाशांची प्रतीक्षा संपली!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाने आता एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार