महाराष्ट्र शासनाकडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका ऐतिहासिक समारंभात, महाराष्ट्र सरकार आणि महावितरणने अधिकृतपणे घोषणा केली की राज्याने 'मागेल त्याला सौर पंप' उपक्रमांतर्गत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला. या योजनेत राज्याने एका महिन्यात एकूण ४५९११ सौरऊर्जा पंप स्थापना साध्य केले हा पहिल्यांदाच जागतिक विक्रम नोंदवण्यात महाराष्ट्र सरकार व महावितरणाला यश आले आहे. या सौरउर्जा योजनेत जगातील सर्वात मोठ्या आणि जलद अक्षय सिंचन उपयोजनापैकी एक मानली जाते.शक्ती पंप कंपनी १९८२ पासून नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेसाठी ओळखली जाते या कंपनीच्या सहकार्याने पीएम कुसुम अंतर्गत सर्वाधिक देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा असलेली कंपनीसह हा नवा विक्रमी प्रकल्प नोंदवला गेला. उपलब्ध माहितीनुसार, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनी ही विक्रमी कामगिरीत सर्वात मोठे योगदान देणारी कंपनी ठरली. त्यांनी ८८४६ सौर पंप बसवले आहेत, जे कोणत्याही सहभागी कंपनीपेक्षा सर्वाधिक आहे.


या सौर ऊर्जा प्रकल्पाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रयत्नासाठी ऑडिट केलेला विक्रमी कालावधी २७ ऑक्टोबर, रात्री १२:०१ ते २५ नोव्हेंबर, रात्री ११:५९ पर्यंत होता असे महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कामगिरीचे अधिकृत सादरीकरण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


'यामुळे महाराष्ट्र सौर शेतीसाठी भारतातील नंबर १ राज्य बनले आहे. ही कामगिरी सिंचन सुरक्षा सुनिश्चित करते, उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते आणि पारंपारिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करते. राज्य सरकार ही गती वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक लवचिक, शाश्वत आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या पुढाकाराबद्दल त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केले.


'या कामगिरीमुळे महाराष्ट्र भारतातील सर्वात जलद सौर शेती करणारे राज्य आणि एकाच प्रशासकीय प्रदेशाद्वारे सौर पंप तैनात करण्याच्या प्रमाणात आणि गतीमध्ये जागतिक स्तरावर चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे' असे एका प्रेस निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्राने आतापर्यंत राज्यात ७.४७ लाख सौर पंप बसवले आहेत. १०.४५ लाख पंप बसवण्याचे लक्ष्य आहे.सरकारने सांगितले की सौर पंप बसवण्यासाठी दुष्काळग्रस्त क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंपांचे आकारमान जमिनीच्या मालकीच्या आधारावर करण्यात आले होते. उदा. २.५ एकरपर्यंतच्या जमिनीसाठी ३ अश्वशक्तीचे पंप, ५ एकरपर्यंतच्या जमिनीसाठी ५ अश्वशक्तीचे पंप आणि मोठ्या शेतांसाठी ७ अश्वशक्तीचे पंप बसवण्यात आले.

Comments
Add Comment

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

युद्धावर बोलण्याऐवजी राज्यसभा निवडणुकीत उबाठाची मते फुटणार नाहीत याकडे लक्ष द्या, बन यांचा राऊतांना टोला

मुंबई : महाविकास आघाडीतील भांडणे ज्यांना सोडवता येत नाहीत, राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षातील कुरघोड्या

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री

'सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तात्काळ निकाली काढा'

मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई