वन विभागाचा मोठा निर्णय; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका नातलगाला मिळेल सरकारी नोकरी

मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या हल्ल्यात कोणी आपल्या घरचा कर्ता पुरुष गमावला आहे तर कोणी लहान मुले, घरातली कमावती माणसे गमावल्याने अनेकांची आर्थिक परिस्तिथी बिकट होत चालली आहे. गावागावांमध्ये नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. काळोख पडू लागताच नागरिक दारं खिडक्या बंद करुन स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने महत्वाचा प्रस्तावावर विचार करत आहे.


वाघ अथवा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातलगाला सरकारी नोकरीचे देण्याच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार सुरू आहे. कुटुंबातील कर्ती माणसे गेल्याने आर्थिक वाताहत, मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती, कर्ज या जबाबदाऱ्यांची ओझी होतात. त्यामुळे संबंधित कुटुंबावर आलेला आर्थिक भर लक्षात घेता सरकार लवकरच या संदर्भात सकारत्मक निर्णय घेऊ शकते अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत बिबट्या आणि वाघांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले, तर काही प्रसंगी मानवांवरही हल्ले होऊन झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीसंदर्भातला प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व