बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी मरणासन्न अवस्थेत सोडून सदर चालक फरार झाला होता. इसाराईल गुर्जर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकातून २० जुलैच्या सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास या ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाने धडक दिली होती. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालक गुर्जर याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, अशी थाप मारत स्वत: ची सुटका करुन घेतली. गुर्जरने रिक्षा गणेशखिंड रस्तामार्गे खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली. लोहमार्गाजवळील दाट झाडीत त्यांना सोडून गुर्जर फरार झाला. दरम्यान, ते गृहस्थ घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने बेपत्ता झाल्याची तक्रार बाणेर पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह खडकीतील लोहमार्गाजवळ सापडला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.
Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच