सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत वाहन पडल्याने दोन महिलांसह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये एकूण सात जण होते, त्यापैकी एक गंभीर जखमी आहेत.





मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ बीएन ०५५ ही इनोव्हा कार दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना नियंत्रण सुटून दरीत कोसळली. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिकांच्या मदतीने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. घाटातील संरक्षक भिंतींची कामे अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Stock Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, एका झटक्यात सात लाख कोटींचे नुकसान

मुंबई : AI चे वाढते महत्त्व, अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वाढत असलेले

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे

शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा घेतला समाचार मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

रिलायन्सला मिळाला व्हेनेझुएलातून तेल खरेदीचा परवाना

मुंबई : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अमेरिकेने लष्करी बळावर अपहरण केले. यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलातील

Devendra Fadnavis: तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा