राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार


मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरु केले राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिल २०२६च्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे. त्यानंतर ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येईल, असे ते म्हणाले.


कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा निश्चित करणार असून कोणत्या घटकांचा समावेश करायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहे. ‘एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळाल्यावर आम्ही कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर परिणाम झाला असून १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. १ कोटी २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २८ जीआर काढले आहेत. नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केवायसी प्रक्रियेवरही युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.


कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळेल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लवकरच येणार नवे धोरण

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबांच्या

Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर देशातील अत्याधुनिक क्रॅश बॅरिअर प्रणाली कार्यान्वित; गोदरेज आणि डेल्टाब्लॉकचा पुढाकार

राज्यातील महत्त्वाच्या महामार्गावरील रस्ते सुरक्षा उपाययोजना भक्कम होणार. मुंबई : गोदरेज एन्टरप्रायझेस

BMC News : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची मायक्रोसरफेसिंग सुधारणा

- तब्बल १३५ कोटी रुपये केले जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेल्या पूर्व आणि

BMC News : विद्याविहार उड्डाणपुलाच्या बांधकामात २१३ झाडे बाधित, महापालिका लागवड करणार २,२७८ झाडांची

- झाडे कापणे, पुनर्रोपीत करणे, देखभाल करणे यावर करणार २ कोटींचा खर्च मुंबई (सचिन धानजी) विद्याविहार रेल्वे

Missing Link : 'सेल्फी' साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी

Rajasthan Royals : मित्तल कुटुंबीयाने आदर पूनावालांसह राजस्थान रॉयल्स संघ १५,६६० कोटी रुपयांना घेतला विकत

मुंबई : राजस्थान रॉयल्सला नवीन मालक मिळाले आहेत. स्टील किंग लक्ष्मी मित्तल आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे