राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार


मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरु केले राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिल २०२६च्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे. त्यानंतर ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येईल, असे ते म्हणाले.


कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा निश्चित करणार असून कोणत्या घटकांचा समावेश करायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहे. ‘एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळाल्यावर आम्ही कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर परिणाम झाला असून १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. १ कोटी २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २८ जीआर काढले आहेत. नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केवायसी प्रक्रियेवरही युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.


कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळेल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय

पुनर्वसन आणि मोबदल्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधानसभेत माहिती मुंबई:

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटीच्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण

मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण

बोरीवली स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर बसवणार सरकता जिना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकला आता सरकता जिना जोडला जाणार

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३

नालेसफाई कंत्राटदारांची थकीत रक्कम देण्यास प्रशासन तयार, कंत्राटदार कामाला करणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.