राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पोट हिस्सा जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले असून, आता ही प्रक्रिया फक्त २०० रुपयांत पूर्ण होणार आहे.


पूर्वी जमिनीच्या हिस्सेवाटपाची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत होता. वारसांमध्ये शेतीची विभागणी झाल्यावर मोजणीसाठी होणारा मोठा खर्च शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त आर्थिक बोजा ठरत होता. काही वेळा तर या प्रक्रियेकरिता कर्ज घ्यावे लागण्याची वेळ ग्रामीण कुटुंबांवर येत होती.


ही अडचण ओळखून सरकारने पोट हिस्सा जमीन मोजणीचे शुल्क थेट २०० रुपयांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, जमिनीच्या वाटपाशी संबंधित वाद, विलंब आणि अनावश्यक खर्चात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून प्रलंबित कामे गावपातळीवरच सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’सारखे उपक्रमही राबवले जात आहेत. या शिबिरांमुळे नागरिकांची अनेक कामे थेट त्यांच्या गावातच पूर्ण होत असून, प्रशासन आता जनतेच्या अधिक जवळ गेल्याचे चित्र निर्माण होत आहे.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की , शेतकऱ्यांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये, यासाठीच शुल्कातील मोठी कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जमीन नोंदी, कागदपत्रांची पूर्तता आणि हिस्सेवाटपाशी संबंधित अनेक प्रश्न अधिक सुलभपणे सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने