मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग निसर्ग, गुलाब, शक्ती वादळांच्या तडाख्यामुळे भरडखोल, श्रीवर्धन, बागमंडला, मेंदडी, दिघी, जीवना बंदर, मुळगाव, वाशी, दिवेआगर, शेखाडी, कुडगाव या किनाऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.


उंच लाटा, अस्थिर हवामानामुळे बोटी नांगरून ठेवाव्या लागत असून डिझेल, बर्फ, दुरुस्तीचे खर्च आकाशाला भिडले आहेत. “समुद्रात गेलो तर प्राण जातो; नाही गेलो तर लेकरं उपाशी मरतात” अशी मच्छिमारांची हृदयद्रावक अवस्था असून मत्स्यव्यवसाय ठप्प झाल्याने बर्फ कारखाने, वाहतूक व्यवसाय, रिक्षा–टेम्पो चालक, बाजारपेठ, व्यापारी, हातगाडीवाले, महिला मच्छीविक्रेत्या सर्वांवर उपजीविकेचे मोठे संकट ओढवले आहे. एका मच्छिमाराचे जाळे थांबले की शंभर घरांची भांडी रिकामी होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून मच्छिमार बांधवांनी डिझेल सवलत तात्काळ लागू करणे, बोट-जाळी दुरुस्ती अनुदान वाढ, थकबाकी कर्जमाफी, आपत्ती निवारक निधीतून आर्थिक मदत, बंद हंगामातील जीवनावश्यक भत्ता पुन्हा सुरू करणे आणि कोकणसाठी विशेष ‘मत्स्यव्यवसाय आपत्ती पॅकेज’ जाहीर करण्याच्या तातडीच्या मागण्या केल्या आहेत.


सागर शक्ती संघटनेचे अध्यक्ष हरिदास वाघे यांनी मच्छिमारांना कृषीसारखेच सवलतीचे दर देऊन फिशरीज विद्यापीठाचे केंद्र श्रीवर्धनमध्ये करण्याची मागणी केली आहे; कोकण मच्छिमार संस्थेचे चेअरमन इम्तियाज कोकाटे यांनी डिझेल सवलत, कर्जमाफी, बोट-जाळी अनुदान वाढ, बंद हंगाम भत्ता तात्काळ मंजूर करण्याचे आवाहन केले आहे.श्रीकृष्ण मच्छिमार संस्थेचे चेअरमन भारत चोगले यांनी पाच महिन्यांच्या बंद हंगामामुळे मच्छिमार कुटुंबे उपासमारीच्या दरीत ढकलली गेल्याचे सांगत विशेष पॅकेज तत्काळ देण्याची मागणी केली असून खासदार, मंत्री, आमदारांनी एकत्रितपणे दबाव आणून मच्छिमारांना दिलासा मिळवून द्यावा, ही संपूर्ण कोकणातील मच्छिमारांची आर्त हाक आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन