मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग निसर्ग, गुलाब, शक्ती वादळांच्या तडाख्यामुळे भरडखोल, श्रीवर्धन, बागमंडला, मेंदडी, दिघी, जीवना बंदर, मुळगाव, वाशी, दिवेआगर, शेखाडी, कुडगाव या किनाऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.


उंच लाटा, अस्थिर हवामानामुळे बोटी नांगरून ठेवाव्या लागत असून डिझेल, बर्फ, दुरुस्तीचे खर्च आकाशाला भिडले आहेत. “समुद्रात गेलो तर प्राण जातो; नाही गेलो तर लेकरं उपाशी मरतात” अशी मच्छिमारांची हृदयद्रावक अवस्था असून मत्स्यव्यवसाय ठप्प झाल्याने बर्फ कारखाने, वाहतूक व्यवसाय, रिक्षा–टेम्पो चालक, बाजारपेठ, व्यापारी, हातगाडीवाले, महिला मच्छीविक्रेत्या सर्वांवर उपजीविकेचे मोठे संकट ओढवले आहे. एका मच्छिमाराचे जाळे थांबले की शंभर घरांची भांडी रिकामी होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून मच्छिमार बांधवांनी डिझेल सवलत तात्काळ लागू करणे, बोट-जाळी दुरुस्ती अनुदान वाढ, थकबाकी कर्जमाफी, आपत्ती निवारक निधीतून आर्थिक मदत, बंद हंगामातील जीवनावश्यक भत्ता पुन्हा सुरू करणे आणि कोकणसाठी विशेष ‘मत्स्यव्यवसाय आपत्ती पॅकेज’ जाहीर करण्याच्या तातडीच्या मागण्या केल्या आहेत.


सागर शक्ती संघटनेचे अध्यक्ष हरिदास वाघे यांनी मच्छिमारांना कृषीसारखेच सवलतीचे दर देऊन फिशरीज विद्यापीठाचे केंद्र श्रीवर्धनमध्ये करण्याची मागणी केली आहे; कोकण मच्छिमार संस्थेचे चेअरमन इम्तियाज कोकाटे यांनी डिझेल सवलत, कर्जमाफी, बोट-जाळी अनुदान वाढ, बंद हंगाम भत्ता तात्काळ मंजूर करण्याचे आवाहन केले आहे.श्रीकृष्ण मच्छिमार संस्थेचे चेअरमन भारत चोगले यांनी पाच महिन्यांच्या बंद हंगामामुळे मच्छिमार कुटुंबे उपासमारीच्या दरीत ढकलली गेल्याचे सांगत विशेष पॅकेज तत्काळ देण्याची मागणी केली असून खासदार, मंत्री, आमदारांनी एकत्रितपणे दबाव आणून मच्छिमारांना दिलासा मिळवून द्यावा, ही संपूर्ण कोकणातील मच्छिमारांची आर्त हाक आहे.

Comments
Add Comment

सावधान! व्हॅलेंटाईन डे दिवशी अशाप्रकारे होऊ शकते फसवणूक; सुरक्षित कसे राहायचे?, जाणून घ्या...

मुंबई: व्हॅलेंटाईन डे आता फार दूर नाही. या दिवशी लोक त्यांचे प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रियकरांना

T20 World Cup 2026 NED vs NAM: नेदरलॅंड्सच्या विजयी खेळीचा पाकिस्तानला फटका

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

Thanya Nathan C: अभिमानस्पद! देशाला मिळाल्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

देशाला लवकरच पहिल्या महिला दृष्टिहीन न्यायाधीश मिळणार आहेत. ही देशासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. केरळच्या

री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड

“मी काहीच केलं नाही…” — ‘तेरे नाम’च्या यशावर सलमान खानचं मोठं विधान व्हायरल मुंबई : सलमान खानची कल्ट क्लासिक

रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूचा स्पष्ट दृष्टिकोन; म्हणाली “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही

मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी

क्षेत्ररक्षण करताना इटलीच्या कर्णधाराचा हात निखळला

मुंबई  : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला शनिवारी ७ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. अनेक मोठ्या संघांची लहान संघांची