वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण


मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवादरम्यान सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चून भरसमुद्रातून १७ किलोमीटरचा सागरी सेतू उभारला जात आहे. त्याचे आतापर्यंत २२ टक्के काम झाले आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत सागरी सेतूचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. तसेच सागरी सेतूला ९.६ किलोमीटर लांबीचे एकूण चार कनेक्टर असून, त्याचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.


वरळी-वांद्रे सी लिंकला लागूनच पुढे वर्सोव्यापर्यंत सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार २०१८ मध्ये या सागरी सेतूच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले होते.


मात्र जुहू, वर्सोवा कनेक्टरच्या एक्झिटमध्ये करण्यात आलेला बदल, मच्छीमारांचा व्यवसाय बाधित होऊ नये, यासाठी पुलाच्या आराखड्यात केलेल्या बदलाचा सुरुवातीला कामावर परिणाम झाला होता. तसेच पावसाळ्यात काम पूर्ण थांबवावे लागत असले तरी गेल्या दोन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या आठ महिन्यांत एमएसआरडीसीकडून वेगाने काम केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले. जूनपर्यंत त्यामध्ये मोठी प्रगती होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक