वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण


मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवादरम्यान सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चून भरसमुद्रातून १७ किलोमीटरचा सागरी सेतू उभारला जात आहे. त्याचे आतापर्यंत २२ टक्के काम झाले आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत सागरी सेतूचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. तसेच सागरी सेतूला ९.६ किलोमीटर लांबीचे एकूण चार कनेक्टर असून, त्याचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.


वरळी-वांद्रे सी लिंकला लागूनच पुढे वर्सोव्यापर्यंत सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार २०१८ मध्ये या सागरी सेतूच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले होते.


मात्र जुहू, वर्सोवा कनेक्टरच्या एक्झिटमध्ये करण्यात आलेला बदल, मच्छीमारांचा व्यवसाय बाधित होऊ नये, यासाठी पुलाच्या आराखड्यात केलेल्या बदलाचा सुरुवातीला कामावर परिणाम झाला होता. तसेच पावसाळ्यात काम पूर्ण थांबवावे लागत असले तरी गेल्या दोन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या आठ महिन्यांत एमएसआरडीसीकडून वेगाने काम केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले. जूनपर्यंत त्यामध्ये मोठी प्रगती होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


Comments
Add Comment

आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर

वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि