वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण


मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवादरम्यान सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चून भरसमुद्रातून १७ किलोमीटरचा सागरी सेतू उभारला जात आहे. त्याचे आतापर्यंत २२ टक्के काम झाले आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत सागरी सेतूचे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. तसेच सागरी सेतूला ९.६ किलोमीटर लांबीचे एकूण चार कनेक्टर असून, त्याचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.


वरळी-वांद्रे सी लिंकला लागूनच पुढे वर्सोव्यापर्यंत सागरी सेतू उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार २०१८ मध्ये या सागरी सेतूच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले होते.


मात्र जुहू, वर्सोवा कनेक्टरच्या एक्झिटमध्ये करण्यात आलेला बदल, मच्छीमारांचा व्यवसाय बाधित होऊ नये, यासाठी पुलाच्या आराखड्यात केलेल्या बदलाचा सुरुवातीला कामावर परिणाम झाला होता. तसेच पावसाळ्यात काम पूर्ण थांबवावे लागत असले तरी गेल्या दोन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्याच्या आठ महिन्यांत एमएसआरडीसीकडून वेगाने काम केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले. जूनपर्यंत त्यामध्ये मोठी प्रगती होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य