पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे इच्छा असूनही मी तुला वेळ देऊ शकत नाही' या शब्दात स्वतःच्या वेदना व्यक्त करत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी चिठ्ठीत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.


यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस टाकून पोलीस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले होते.


हवालदार निखिल रणदिवे यांची बदली यवतहून शिक्रापूर येथे झाली होती. पण या बदली आदेशाची अंमलबजावणी करण्यास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख टाळाटाळ करत होते; असेही चिठ्ठीत नमूद आहे.


हवालदार निखिल रणदिवे कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची विभागीय चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच