‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत!


मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत ‘लग्नपंचमी’हे नवीन नाटक नवीन वर्षाच्या सुरुवातीला रंगभूमीवर घेऊन येत असल्याने रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता आता आणखी वाढणार आहे, कारण मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी व टेलिव्हिजन, ओटीटी या क्षेत्रांमधील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत सूर्यजाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. म्हणजेच ‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून ती नाट्यसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘लग्नपंचमी’ हा लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने मांडणारा नवीन मराठी प्रयोग नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमृताच्या चाहत्या वर्गाला या नाटकाची उत्सुकता नक्कीच लागून राहणार आहे.


अमृताने हे नाटक करायचे का ठरवले, याबद्दल बोलताना, ती म्हणते, “मी नाटकात काम करीन असे माझ्या कधी मनातही आले नव्हते. शिवाय मला काही चांगली, आकर्षक संधीही आतापर्यंत मिळाली नव्हती. कोणत्याही नाटकासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी आणि कटिबद्धता लागते. मोठ्या प्रमाणावर सराव लागतो आणि विविध शहरांमधील प्रयोग कित्येक महिने करावे लागतात. मला ते करणे कठीण वाटत होते.”


‘लग्नपंचमी’बद्दल बोलताना ती म्हणाली की, नाटकाचा विषय आणि या नाटकाची टीम यांच्यामुळे या नाटकाकडे मी आकर्षित झाले. “एलिझाबेथ एकादशी, वाळवी यांसाख्या चित्रपटांची लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी माझा विचार या नाटकासाठी केला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मला त्यांच्याबरोबर आणि या नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याबरोसबर काम करायचेच होते.” ती म्हणते.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून