तज्ज्ञांकडून आरबीआयच्या पावलाचे स्वागत- एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटचा अहवालातून दुजोरा

मुंबई: एचएसबीसी ग्लोबल रिसर्च इन्व्हेसमेंटने दिलेल्या अहवालानुसार, वित्तीय पतधोरण समितीने जाहीर केलेल्या व्याजदर कपातीच्या तज्ज्ञांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात आल्याचे आपल्या अहवालात नमूद केले. काल तीन दिवसीय वित्तीय पतधोरण समितीची बैठक पार पडली ज्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी २५ बेसिस पूर्णांकाने कपात घोषित केली. त्यामुळे ५.५०% वरून ५.२५% रेपो दर झाल्याने मोठ्या प्रमाणात कपातीचा फायदा ग्राहक केंद्रित बाजारात जाणवू शकतो. प्रामुख्याने कर्जाच्या मागणीत व पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याने बाजारातील तरलता (Liquidity) बाजारात मोठ्या प्रमाणात वाढू शकते.तज्ञांच्या मते यामुळे क्रेडिट वाढ अपेक्षित आहे. याविषयी बोलताना अहवालात हे देखील स्पष्ट आहे की यामुळे बाजारात १.४५ लाख ट्रिलियन रूपयांची तरलता वाढू शकते. त्यांनी आपल्या अहवालात उल्लेख केल्याप्रमाणे,'आरबीआयने २५ बेसिस पॉइंट्स रेपो दरात कपात केल्याने त्यांच्या कडक भूमिकेमुळे आर्थिक वर्ष २७ मध्ये वाढ कमकुवत झाल्यास आणखी सवलती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर परकीय चलनातील घसरणीमुळे निर्यात स्पर्धात्मकता सुधारू शकते असे एका अहवालात म्हटले आहे.


आरबीआयने बाजारात अतिरिक्त तरलता वाढवण्यासाठी १ ट्रिलियन रुपयांच्या ओपन मार्केट ऑपरेशन्स खरेदी आणि ३ वर्षांच्या डॉलर- रुपये व ५ अब्ज डॉलर्सच्या खरेदी-विक्री स्वॅपच्या योजना जाहीर केल्या होत्या. यावर एचएसबीसीने म्हटले आहे की त्यांचे महागाईचे अंदाज आरबीआयच्या तुलनेत सुमारे ५० बेसिस पॉइंट्स कमी आहेत. आर्थिक वर्ष २७ मधील पहिल्या तिमाहीत (H1FY27) कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आम्हाला वाटते की सध्या वाढ मजबूत आहे, परंतु वित्तीय कडकपणा, कमकुवत निर्यात आणि जीएसटी वाढीतील घट यामुळे मार्च तिमाहीपर्यंत ती मंदावेल. आर्थिक असहिष्णुतेच्या जगात वित्तीय धोरण कडक राहील आणि वाढीला आधार देण्याची जबाबदारी आरबीआयवर येईल असे अहवालात म्हटले आहे.


आरबीआयने महागाईचा अंदाज कमी केला, वाढ कमी होऊ शकणाऱ्या क्षेत्रांवर चर्चा केली आणि पुरेशी तरलता सुनिश्चित केली असे अहवालात म्हटले आहे. केंद्रीय बँकेचे धोरण कमकुवत होते कारण त्यांनी आर्थिक वर्ष २६ आणि आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या सहामाहीसाठी चलनवाढीचा अंदाज अनुक्रमे ६० बीपीएस आणि ५० बीपीएसने कमी केला आणि आर्थिक वर्ष २६ साठी जीडीपीचा अंदाज ७.३% वाढवला आहे. 'तरलतेबाबत बोलताना डिसेंबरमध्ये आरबीआय १.४५ ट्रिलियन रुपयांचा निधी देत आहेच असे गव्हर्नरने नमूद केले आहे. गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो' असे अहवालात नमूद केले आहे.अर्थव्यवस्थे च्या वाढीला चालना देण्यासाठी आरबीआय एमपीसी सदस्यांनी एकमताने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.२५% करण्याचा निर्णय घेतला. विश्लेषकांनी सांगितले की, रेपो दर कमी करण्याचा आरबीआयचा निर्णय हा कमी चलनवाढीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक जागेचा वापर करून वापराला चालना देण्यासाठी आणि विकास चक्राला बळकटी देण्यासाठी केला जात आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे