जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव


अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील ४५४ कुपोषित बालके आढळून आली आहेत, ज्यात ६१ तीव्र, तर ३९३ मध्यम कुपोषित बालकांचा समावेश आहे. आदिवासी बहुल भागात कुपोषणाचे प्रमाण अजुनही अधिक असल्याचे दिसून येते. शासनाकडून कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही.


महिला व बालकल्याण विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील १६ प्रकल्पांतील ३ हजार १६१ अंगणवाड्यांचे, तसेच मिनी अंगणवाड्यातील मुलांचे सर्वेक्षण केले. यापैकी ९८ हजार ७८० मुलांचे वजन घेण्यात आले. या सर्वेक्षणात तीव्र कुपोषित श्रेणीतील ६१ बालके, सौम्य कुपोषित श्रेणीतील ३९३ बालके आढळली. कर्जत, रोहा, माणगाव, पोलादपूर, पेण, महाड या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण


अधिक आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महिला बालकल्याण विभागाने ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली. या योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जातो आहे. मात्र, तरीही कुपोषणाचे प्रमाण घटलेले नाही. या समाजात होणारे बालविवाह, बेरोजगारी, आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर, त्यामुळे मुलांची होणारी आबाळ ही कुपोषणाची मागची कारणे आहेत.


कुपोषित बालकाचे नियमित सर्वेक्षण केले जाते. कुपोषित आढळणाऱ्या बालकांना पोषण आहार दिला जात आहे. तीव्र कुपोषित बालकांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यामुळे सॅम १५, तर मॅम श्रेणीतील १०१ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. -निर्मला कुचिक, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग)

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका