'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर


नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' हे विधेयक सादर करण्यात आले. यावेळी, संसदेची मंजुरी मिळून हा कायदा लागू झाल्यानंतर घरगुती किराणा सामान किंवा आवश्यक औषधे यांच्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर महागाईचा अतिरिक्त भार पडणार नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केले. हे विधेयक मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या जीएसटी भरपाई उपकराची जागा घेणार आहे.


लोकसभेत हे विधेयक मांडताना अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा उपकर सामान्य माणसासाठी दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंवर लादला जाणार नाही, तर गुटखा आणि पानमसाला सारख्या हानीकारक तंबाखूजन्य उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांतील यंत्रसामग्रीच्या उत्पादन क्षमतेनुसार तो लादला जाणार आहे. तसेच हा उपकर प्रत्येक कारखान्यासाठी त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार बदलणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उपकरातून मिळणाऱ्या महसुलाचा एक भाग देशाच्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमांना निधी देण्यासाठी वापरला जाणार असल्याचे, सीतारामन यांनी सांगितले.





सध्या, पान मसाला, तंबाखू आणि संबंधित हानीकारक उत्पादनांवर २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि वेगवेगळे भरपाई उपकर आकारले जातात. भरपाई उपकर रद्द केल्यानंतर यांचा जीएसटी दर ४० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या उपकराचा जीएसटी महसुलावर परिणाम होणार नाही. पान मसाल्यावर उत्पादन शुल्क आकारता येत नाही. म्हणून, सरकारने त्यावर उपकर लावण्यासाठी एक विधेयक आणले आहे, जो जीएसटी व्यतिरिक्त आकारला जाईल.


आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करणाऱ्या तंबाखूजन्य उत्पादनांच्या वापरावर आळा बसावा यासाठी वाढीव उपकर लावणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. दरम्यान तांदूळ, डाळी, पीठ, मीठ, साखर, दूध, भाज्या, फळे, आवश्यक औषधे, साबण, तेल, टूथपेस्ट आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तू आरोग्य उपकरांतून वगळल्या आहेत.


Comments
Add Comment

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली