गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश


पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या प्रकारानंतर उठाबशा काढल्याने प्रकृती बिघडलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वसईत मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.


सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या काजल (अंशिका) गौड या मुलीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला होता. या प्रकरणी वालिव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले आहे. तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती.


दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत असल्याबाबत तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी ( शिक्षण ) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे.


शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील तरतुदीचे पालन न करणे असे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.

Comments
Add Comment

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

XChat : लाँच झाले एक्सचे एक्सचॅट ॲप

टेक्सास : एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेसेजिंग ॲप एक्सचॅट लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप फक्त आयओएस