गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश


पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या प्रकारानंतर उठाबशा काढल्याने प्रकृती बिघडलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वसईत मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.


सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या काजल (अंशिका) गौड या मुलीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला होता. या प्रकरणी वालिव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले आहे. तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती.


दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत असल्याबाबत तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी ( शिक्षण ) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे.


शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील तरतुदीचे पालन न करणे असे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण; मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत

FIFA World Cup 2026: ब्राझील व क्रोएशियाचे वर्ल्ड कप संघ जाहीर, नेमारची एन्ट्री

ब्राझीलिया : फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA World Cup 2026) ब्राझील (Brazil national football team) आणि क्रोएशियाने (Croatia national football team) त्यांचे संघ जाहीर

Sandeep lamichhane : संदीप लामिछानेने केला वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम

त्रिभुवन : नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड या वन डे मध्ये

ॲमिटी विद्यापीठाला पनवेलमध्ये १५ एकर जमीन; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व