प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला. लग्नाच्या अनेक सुखद आठवणी प्राजक्ताने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या.


पण चर्चा रंगली ती प्राजक्ताच्या विवाह सोहळ्यातील एन्ट्रीची, या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण होतं ते म्हणजे शिव आणि गणांचं... यात प्राजक्ता आणि शंभूराज एका नंदीवर बसून मंडपात आले होते. यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यांनी विवाह सोहळ्यातील देखाव्यावर आक्षेप नोंदवला होता. देवांचा अपमान होतो आहे असेही काही लोकांचे म्हणणे होते.


पण ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत लग्नातील शिव आणि गणांच्या तसेच प्राजक्ताच्या एन्ट्री संदर्भात त्यांचे मत मांडले. ज्यांना पूर्ण माहिती नाही अशांकडूनच वाद घातला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.


धर्मशास्त्रानुार जोडपं नर नारी न राहता, विवाहप्रसंगी विष्णू आणि लक्ष्मी असतात. ब्रह्मवैवर्थ पुराणात लक्ष्मी आणि विष्णूच्या विवाहात शिव आणि त्यांच्या गणांनी भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हा शिवात्मक देखावा दाखवणं हे अज्ञान नसून देवांचा अपमान नसून तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन परंपरेचं मूर्त स्वरुप समोर आणायचं हा हेतू होता. अगदी विवाह विधींमध्ये सुद्धा ब्राह्मण मंत्रोउच्चारातून शिव आणि त्याचा गणांचा उल्लेख करतात. त्यामुळे प्राजक्ताने नंदीवरुन लग्नाच्या ठिकाणी केलेली एन्ट्री वादग्रस्त नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन