'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस स्टँडसारखी झाली असून, प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळावर पाहायला मिळत आहे. इंडिगाने पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली. मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास करण्यासाठी तब्बल ६१ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले. या वाढीनुसार, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट २७ हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी ४९ हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागले.दरम्यान, मुंबईहून लंडनला जाण्यासाठी किमान प्रिमियम इकॉनॉमीचे तिकीट ५० हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मुंबईहून थायलंडसाठी १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विमान भाडे आकारले जाते. मात्र, इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ६१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले.


सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटे मात्र चौपट दराने विकली जात आहेत. देशभरातून इंडिगोची तब्बल ६०० हून अधिक विमाने शुक्रवारी रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री ११.५९ वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असे निवेदन कंपनीने जारी केले.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना घालून दिलेल्या नवीन नियमांमुळे इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीची वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडून पडली. नवीन ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’च्या (एफडीटीएल) नियमांमुळे कर्मचाऱ्यांची (क्रू) कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, आता डीजीसीएने एफडीटीएलशी संबंधित सर्व निर्देश मागे घेतले. त्यामुळे आता इंडिगोसह देशभरातील विमान वाहतूक कंपन्यांची सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार; मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा

MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची बहुप्रतीक्षित विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी

Bhayander Illegal Mosque Demolished : मीरा-भाईंदरमध्ये मोठी कारवाई; अनधिकृत मशीद पाडली, परिसरात तणावपूर्ण शांतता

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील भाईंदर पूर्व येथील आझादनगर परिसरात आज सकाळी मोठी कारवाई करण्यात

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय

Suicide News : अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी; युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक

Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव बसचा कहर; ३ बाईक, टॅक्सी आणि ओला-उबेरला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन

MahaDBT Students Scheme : मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मिळणार; कोण पात्र? जाणून घ्या

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक