नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाल्याचं स्पष्ट होत आहे, तर भाजपाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.


फक्त नगराध्यक्ष आणि ९ वॉर्डांसाठीच लागू सुधारित कार्यक्रम


नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त नगराध्यक्ष पद आणि ९ वॉर्डांसाठीच सुधारित कार्यक्रम लागू राहणार आहे.नव्या अर्जांना परवानगी नसेल. फक्त मंजूर अर्जवाल्यांनाच अर्ज मागे घेण्याची मुभा दिली आहे. यामुळे आधीच घेतलेले निर्णय कायम राहणार आहेत.


भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध – मिळणार नाही पुनर्जीवन


छाननीत भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. निवडणूक स्थगित झाल्यानंतर नव्याने अर्ज भरण्याची परवानगी मिळेल अशी BJP मध्ये चर्चा होती, ज्यामुळे ५ पैकी २ उमेदवारांना संधी मिळू शकते अशी अपेक्षा होती.
मात्र सुधारित कार्यक्रमाने हा मार्ग बंद झाला आहे. ज्यांचे अर्ज बाद आहेत ते बादच राहणार – हे स्पष्ट झाले आहे.


६ ब आणि ७ अ वॉर्डांचे अर्जही बादच


६ ब आणि ७ अ या वॉर्डांच्या निवडणुका आधी नव्याने जाहीर झाल्या होत्या.या दोन्ही वॉर्डांतील BJP उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले गेले होते.आताच्या निर्णयामुळे हे अर्ज पुनर्जीवित होणार नाहीत आणि नव्याने अर्जही दाखल करता येणार नाहीत.


भाजपाला मोठा धक्का – शिवसेना फायद्यात


निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.उलट, भाजपाच्या अनेक वॉर्डांमध्ये उमेदवार नसण्याची परिस्थिती कायम राहणार आहे, ज्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.


मतदानाची तारीख जाहीर


न्यायालयाचा निकाल उशिरा आल्याने २ डिसेंबरची निवडणूक स्थगित करण्यात आली होती.


आता नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे


मतदान : २० डिसेंबर २०२५
मतमोजणी : २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून


सुधारित कार्यक्रमानुसार —


२४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी तसेच ७६ नगरपरिषद व नगरपंचायतीमधील १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक कार्यक्रम राबवला जाईल.

Comments
Add Comment

EL Nino : एल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाईचे सावट; धरणसाठा घटला, शासन यंत्रणा सतर्क

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती आणि

मी दिल्लीला गेलो नाही - ओमराजे निंबाळकर

२० जूननंतर माध्यमांशी सविस्तर संवाद साधणार मुंबई : उबाठा गटाला खिंडार पाडणाऱ्या 'ऑपरेशन टायगर'च्या

Nashik : फेस रिकग्निशनद्वारे होणार नाशिकमध्ये मतदान, विधान परिषद निवडणुकीत राज्यातील पहिला प्रयोग

नाशिक : निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी नाशिकमध्ये एक महत्त्वाचा तांत्रिक प्रयोग

FIFA WORLDCUP 2026 : 'हायड्रेशन ब्रेक' वादाच्या भोवऱ्यात; खेळाच्या गतीवर परिणाम झाल्याचा आरोप

अटलांटा: यंदाच्या फिफा विश्वचषकात फिफाने सुरू केलेल्या ‘हायड्रेशन ब्रेक’ (पाणी पिण्यासाठी विश्रांती) या नवीन

Rohit Sharma : रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी; लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा पार

लखनऊ: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय

Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा वाद! आऊट असून अंपायरने दिला नॉटआऊट ? तरीही मोठी खेळी करण्यात अपयश...

Mumbai : भारत अ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी मालिकेत खेळत आहे. या मालिकेत भारत अ संघ चार पैकी दोन सामने जिंकला आणि दोन