तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महापालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तक्रार येण्याची वाट न पाहता यादीतील चुका स्वतःहून शोधून दुरुस्त करा, दुबार मतदारांची नावे काळजीपूर्वक तपासा आणि मतदानाच्या दिवशीही याबाबत दक्ष राहा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


गुरुवारी सर्व महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन वाघमारे यांनी हे निर्देश दिले. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, दुबार नाव असलेला मतदार एकदा मतदान केंद्र निवडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मतदान करू शकणार नाही. यामुळे निवडणुकीत गोंधळ आणि गैरप्रकार टाळता येतील.


दरम्यान, सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची मूळ मतदारयादीच वापरली जाते. फक्त तिचे प्रभागनिहाय विभाजन केले जाते. त्यात मतदारांचे नाव-पत्ता बदलले जात नाहीत. यंदा दि. १ जुलै २०२५ ही पात्रतेची तारीख (क्वालिफायिंग डेट) निश्चित करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


आता दहा डिसेंबरला येणार अंतिम यादी


- प्रारूप मतदारयादीवर आलेल्या हरकती आणि सूचनांची तातडीने पडताळणी करून १० डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करावी.
- दुबार नावांचा कसून शोध घ्यावा. अशी नावे महापालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि वेबसाइटवर जाहीर करावीत.
- ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी (**) चिन्हासह दिसत आहेत, त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारावे आणि अर्ज भरून घ्यावा.
- अर्ज केले नाही तर मतदानाच्या दिवशी मतदाराकडून हमीपत्र लिहून घेऊन, ओळख पडताळल्यानंतरच मतदानाची परवानगी द्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध