ज्ञानी व्हा, धन्य व्हा!

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आज आपण ज्या विषयाला सुरुवात करत आहोत तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. हा विषय सर्व दृष्टीने महत्त्वाचा आहे. कसा? प्रत्यक्षात “अंधारातून प्रकाशाकडे” म्हणजे काय ? अंधार म्हणजे अज्ञान व प्रकाश म्हणजे ज्ञान. अंधार म्हणजे दुःख, प्रकाश म्हणजे आनंद. अंधार म्हणजे अनिष्ट, प्रकाश म्हणजे इष्ट. अंधार म्हणजे रोग, प्रकाश म्हणजे आरोग्य. अशा प्रकारे आपण पाहिले तर अंधार व प्रकाश, आपल्या जीवनात कसा असतो व कसा असला पाहिजे हे ध्यानात येईल. आज बारकाईने पाहिले तर सगळीकडे अंधार पसरलेला आहे. प्रकाश ज्याला आपण स्वयंप्रकाश म्हणतो तो असून नसल्यासारखा झालेला आहे. एखाद्या दिव्यावर काजळी आलेली असेल, तर त्या दिव्याचा प्रकाश पडत नाही. ती काजळी दूर केली तरच तो प्रकाश सर्वदूर पोहोचेल. तसे आपण जरी स्वयंप्रकाशी असलो तरी, आपण स्वयंप्रकाशित कसे आहोत हे आपल्याला माहीत नाही. मुळात आपण स्वयंप्रकाशित आहोत हेच कोणाला माहीत नाही. त्या स्वयंप्रकाशावर अज्ञानाची काजळी आल्यामुळे त्याचा प्रकाश पडत नाहीच उलट काळोखच पसरला आहे. हे बदलण्यासाठी अंधार म्हणजे अज्ञान हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, “तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे”


सांगायचा मुद्दा हा की, आपले राष्ट्र प्रगतिपथावर जायला पाहिजे असेल, तर आपल्या राष्ट्रातील लोकांनी ज्ञानी झाले पाहिजे, हुशार झाले पाहिजे, बुद्धिमान झाले पाहिजे. पण वस्तुस्तिथी अशी आहे की सर्वत्र अंधार आहे. एक काळ असा होता की, भारत देशात सर्व काही होते. ऐश्वर्य, ईश्वर, धनधान्य सर्व काही या देशांत मुबलक होते. इतकेच नव्हे तर सुवर्णाचा धूर निघत होता. पण आज आपल्या हातात काही नाही. आपल्याला स्वराज्य मिळाले पण सुराज्य मिळाले नाही. आपल्याला काय मिळाले तर परकीयांपासून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांपासून सर्वांना, सर्व देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण पुन्हा देश आपल्याच काही लोकांच्या ताब्यात गेला. अगदी आजही परिस्थिती काही अंशी तशीच आहे. याचे कारण आपल्या राष्ट्रात अंधश्रद्धा, अज्ञान, भोळसटपणा प्रचंड प्रमाणात आहे. भाविक असणे व बावळट असणे यात फरक आहे. मात्र आज असे झालेले आहे की, बावळट माणसालाच भाविक म्हटले जाते. प्रत्यक्षात ज्याच्याकडे भाविकता असते तो भाविक. या दोन्ही गोष्टी अत्यंत भिन्न आहेत. पण अज्ञानातून झालेल्या गैरसमजापायी बरेचदा या दोन्हींना एकच मानले जाते. किंबहुना आज जगात जे काही वाईट आहे त्या सर्वाचे मूळ म्हणजे अज्ञानच. हे अज्ञान दूर होईपर्यंत आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्वांगाने प्रगती करून पुढे जाईल अशी केवळ आशा करणे चुकीचे आहे. यावर मात करण्यासाठी सर्व समाजाने, समाजातील प्रत्येकाने ज्ञान मिळविणे, शिक्षण घेणे हा त्यावरचा उपाय. कारण जीवनविद्येच्या मते ज्ञान हे शस्त्र, अस्त्र व शास्त्र आहे, ज्ञान हे शक्ती, बळ व सामर्थ्य आहे, ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे, ज्ञान हा देव, परमेश्वर व ईश्वर आहे, म्हणून ज्ञानी व्हा, धन्य व्हा.

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन