नवी मुंबईत ११ महिन्यांत ३४९ मुली बेपत्ता !

नवी मुंबई : नवी मुंबईतून १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. यात ३४९ मुली व १५० मुले आहेत. ४५८ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ४१ जणं अद्यापही असुरक्षित आहेत. त्यात ३४ मुलींचा समावेश आहे. वाढलेल्या प्रकरणांमुळे मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. या बेपत्ता मुलींमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण जास्त आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मिडीया, कुटुंबातील विसंवाद ही यामागील कारणे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


अनेक केसेसमध्ये मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ४१ मुला-मुलींचा अध्याप शोध लागलेला नाही. यातील २५ गुन्हे पोक्सो अंतर्गत नोंद झालेले आहेत त्यामुळे ही प्रकरणे गंभीर मानली जातात. पालकांसाठी पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मुलांच्या वागणुकीत बदल, त्यांचे ऑनलाईन राहणे, अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री याकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलीस करतात. याबद्दल विविध शाळा-­महाविद्यालयांमध्येही जनजागृती केली जात असल्याची माहिती व.पो.नि.पृथ्वीराज घोरपडे, मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष यांनी दिली.


१ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात येथील विविध पोलिस ठाण्यांतून बेपत्ता मुला-मुलींच्या नोंदींमध्ये सर्वाधिक आकडे तुर्भे पोलीस ठाण्यातील (५१) आहेत. त्यापाठोपाठ रबाळे (४९), रबाळे एमआयडीसी (४१), पनवेल शहर (३९), खारघर (३३), तळोजा (३१), कोपरखैरणे (३२), एनआरआय (३०) यांशिवाय कामोठे (२२), खांदेश्वर (२०), नेरुळ (१८), एपीएमसी (१९) या भागांसह इतर भागातीही लक्षणीय प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Comments
Add Comment

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

India Women's Cricket Team : आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमन कर्णधार

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महिला निवड समितीने सप्टेंबर २०२६ मध्ये जपानमधील ऐची-नागोया येथे